पुणे :- पुणे जिल्हयात धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासन, पोलीस यंत्रणा व अपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आषाढी वारी २०२६ श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्या येत आहे.की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदीत प्रवेश करणारे नदीवरील चार ही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या प्रस्थानासाठी येणा-या भाविक व वार कऱ्यांनी जर प्रवासाला सुरुवात केलेली असेल तर त्याच ठिकाणी आपण सुरक्षित थांबावे. आळंदी मध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. सूचनांचे काटेकोर पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नदीपात्र, घाट परिसर, व बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.
तसेच भीमानदीलाही मोठ्या प्रमाणात पूर आला असल्याने परिसरातील शेतकरी, रहिवाशी, मासेमारी करणारे व्यावसायीक, व नदीला आलेला पूर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लहान मुले, जेष्ठ नागरिक व महिलांनी पाण्याजवळ जाऊन नये. तसेच तरुण व तरुणींनी शेल्फिच्या नादात जीव धोक्यात घालू नये.
दौंड तालुक्यात भिमानदीला आलेल्या पुरामूळे नदी किनार्यावरील स्मशानभूमी, मंदिरे पाण्याने वेढलेली असल्यामूळे त्याठिकाणी कोणीही जाऊ नये.
अजूनही धरण परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे.दौंड येथील भिमानदीत पात्रात असलेले पुरातन महादेव मंदिर पाण्याखाली गेलेले आहे.
मुख्य संपादक :- सुभाष कदम
श्री. समर्थ न्यूज २४

✍🏻मुख्य संपादक – सुभाष कदम
























